गल्ल्या-गल्ल्यांमध्ये बाटल्यांचे खच ,आम्ही वादनासाठी तयार होतो, पण.. सौरभ गोखलेनं सांगितलं मिरवणुकीच्या दिवशी काय घडलं?

Saurabh Gokhale on DJ controversy and Ganpati miravnuk:अनंत चतुर्दशीच्या दिवशी ठिकठिकाणी ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष यघोष करत गणरायाचं विसर्जन झालं. विसर्जनाच्या मिरवणुकींमध्ये ढोल-ताशांची परंपरा आजही जपली जाते. पुण्यात मात्र या दिवशी वेगळंच चित्र बघायला मिळालं.
दीपश्री आपटेडीजे संस्कृतीनं पारंपरिक वादनाची मुस्कटदाबी केल्याचं दिसून आलं. गेल्या अनेक वर्षांपासून कलावंत पथक ढोल-ताशाचं वादन करत परंपरा जपत आहे. पण यावर्षी त्यांना वेगळाच अनुभव आला. त्यावेळी मिरवणुकीत वादन न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पुणेकरांसाठी आणि पारंपरिक तालवाद्यप्रेमींसाठी हा मोठा धक्का ठरला.
कलावंत पथकामधील सौरभ गोखले यानं याबद्दल सांगितलं, ‘कलावंत पथकाला मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळानं विसर्जन मिरवणुकीसाठी आमंत्रित केलं होतं. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी ६ वाजता आम्ही वादनासाठी तयार होतो. पण टिळक रोडवरील विसर्जन मिरवणूक बराच वेळ एकाच जागी थांबली होती. मंडळानं सर्वतोपरी प्रयत्न करूनही मिरवणूक एक इंचही पुढे न सरकल्यानं रात्री ९ वाजता असलेल्या जागेवरूनच आम्ही गजर आणि ध्वजवंदन करून वादनास विराम देण्याचा निर्णय घ्यावा लागला.’2 अभिनेत्यांसोबत ब्रेकअप झाल्यामुळे निराश झालेली अभिनेत्री, म्हणाली दुसऱ्यापेक्षा पहिलावाला मला खूप….डीजेविषयी सौरभनं नाराजीही व्यक्त केली. तो म्हणाला, “डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी आम्ही आग्रही आहोत. साऊंड व्यावसायिकांचीही बाजू लक्षात घेता मंडळांनी मंडपांमध्ये साऊंड लावणं ही त्यांची वैयक्तिक निवड असेल, परंतु मिरवणूक डीजेमुक्त असणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येक स्तरावरून प्रयत्न होणं गरजेचं आहे. आम्ही कलावंत पथकही प्रयत्नशील असू. पुण्यातले साधारण २५०-३०० ढोल-ताशा पथक, प्रशासन, पोलिस, उत्सव मंडळ यांना आम्ही एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन करणार आहोत. तसंच आगमन आणि विसर्जन मिरवणुकींमध्ये पारंपरिक वाद्यांनाच परवानगी हवी, असं आपण ठामपणे प्रशासनाला सांगितंल, तर मिरवणुकीचं स्वरूप बदलू शकतं.’
सोशल मीडिया स्टार डॅनी पंडितला मोठी लॉटरी, रील्समधून थेट सिनेमात एन्ट्री, रिंकू राजगुरूसोबत झळकणारसौरभनं डीजेशिवायही काही मुद्द्यांकडे लक्ष वेधलं. ‘मिरवणुकीत दारू पिऊन गर्दीत शिरणाऱ्या लोकांमुळेसुद्धा असुरक्षितता वाटते. फक्त दोन दिवस ड्राय डे जाहीर करून काही होत नाही. लोक आधीच स्टॉक करून ठेवतात. मी स्वतः मिरवणुकीच्या दिवशी गल्ल्या-गल्ल्यांमध्ये बाटल्यांचे खच पाहिले आहेत. त्यामुळे मिरवणुकीच्या दिवशी त्यात सहभागी होणाऱ्या लोकांची कडक तपासणी आणि कारवाई संबंधित मंडळांकडून होणं गरजेचं आहे. आमच्या पथकातील मुली गर्दीत घाबरून रडायला लागल्या होत्या. मिरवणुकीत नेहमी सहभागी होणाऱ्या मुलींसाठीसुद्धा हा अनुभव इतका त्रासदायक असेल. तर सामान्य नागरिक, लहान मुलांसाठी तो किती धोकादायक असेल याची कल्पना येईल’, असं तो म्हणाला.

नकारात्मक गोष्टी बाप्पाच्या पायाखाली जावो, पुण्यात पारंपरिक रांगोळीतून सामाजिक संदेश

डीजेमुक्त मिरवणुकीसाठी आम्ही कलावंत पथक ठाम भूमिका घेणार आहोत. नागरिक आणि जबाबदार मंडळांना सोबत घेऊन प्रशासन, पोलिसांपर्यंत नेमकी आखणी पोहोचवू. गणेशोत्सवाचं पूर्वीचं वैभव आणि परंपरा परत मिळवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.-सौरभ गोखले, अभिनेता
 

Author

Leave a Comment