आशिया कप: भारताचा 21 धावांनी विजय, मग ओमानचं कौतुक का? जाणून घ्या या संघाच्या अस्तित्वाची कहाणी

आशिया कप: भारताचा 21 धावांनी विजय, मग ओमानचं कौतुक का? जाणून घ्या या संघाच्या अस्तित्वाची कहाणी

फोटो स्रोत, SAJJAD HUSSAIN/AFP via Getty

4 मिनिटांपूर्वी

सध्या संयुक्त अरब अमिरात (युएई) मध्ये आशिया कप क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान यांच्यासह युएई, हाँगकाँग आणि ओमानचे संघ खेळत आहेत.

भारताने पाकिस्तान आणि युएईला पराभूत केल्यानंतर 19 सप्टेंबरला ओमानवर 21 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने आशिया कपमध्ये विजयाची हॅट्रिक नोंदवली.

असं असलं तरी, जागतिक टी-20 क्रमवारीत 20 व्या स्थानावर असलेल्या ओमानने नंबर वन असलेल्या भारतीय संघाला ज्याप्रकारे आव्हान दिलं, त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 188 धावा केल्या, तर ओमानच्या टीमने 20 षटकांत 167 धावांची खेळी केली.

या सामन्यात भारतीय संघाचे 8 फलंदाज माघारी परतले, तर दुसरीकडे भारतीय गोलंदाज ओमानच्या फक्त 4 फलंदाजांनाच बाद करू शकले.

Skip सर्वाधिक वाचलेले and continue reading
सर्वाधिक वाचलेले

भात की चपाती, रात्री काय खाणं योग्य? आहारशास्त्राचा याबाबत दृष्टीकोन काय?

डिजिटल अरेस्टमुळे डॉक्टर महिलेला हार्ट अटॅक, धमक्यांचे मेसेज मृत्यूनंतरही सुरूच; नेमकं काय आहे प्रकरण?

मेंढपाळाला दिसला जिवंत पुरलेल्या बाळाचा हात आणि सुरू झाली चिमुकलीच्या जीवन-मरणाची लढाई

पीएचडीच्या विद्यार्थ्यानं ‘गुगल सर्च’ केलं आणि सापडलं जंगलात लपलेलं अख्खं शहर

End of सर्वाधिक वाचलेले

ओमानकडून फलंदाजीला उतरलेल्या आमिर कलीमने 46 चेंडूत 64 धावा केल्या, तर हम्माद मिर्झाने 33 चेंडूत 51 धावांची खेळी केली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

 

Author

Leave a Comment