
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘करो या मरो’चा मंत्र देत जुलमी इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा दिला. आज देशात तीच परिस्थिती आहे, लोकशाही व संविधान गिळंकृत करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात चले जावचा नारा देण्याची गरज आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज व्यक्त केली. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेसने गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत पदयात्रा […]