Chhagan Bhujbal: …तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; छगन भुजबळांचा सरकारला इशारा

Chhagan Bhujbal On OBC Maratha Reservation: : भुजबळ यांनी सोमवारी दुपारी एमईटी येथे प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर त्यांनी समाजाची भूमिका स्पष्ट करत ओबीसींच्या हक्कावर गदा आल्यास त्याविरोधात आंदोलन करण्याचे सूतोवाच केले.

मुंबई :मराठा आणि कुणबी एक नाही तर वेगवेगळ्या जाती आहेत.मराठा समाजसामाजिकदृष्ट्या मागास नाही, असे न्यायालयानेच म्हटले आहे. त्यामुळे आंदोलकांना काय द्यायचे, हा प्रश्न पूर्णपणे सरकारचा आहे. परंतु आमच्या ओबीसी प्रवर्गात त्यांचा समावेश करू नका. आम्हाला ओबीसीत वाटेकरी नको. तसे जर झालेच तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ,’ असा इशारामंत्री छगन भुजबळयांनी सोमवारी दिला.

गावागावांत आंदोलन करण्याचा तसेच, गरज पडल्यास लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊन आंदोलन करण्याचाही इशारा यावेळी भुजबळ यांनी दिला.
Maharashtra Times‘काय उपयोग रे तुमचा?’, मनोज जरांगे आपल्या आंदोलकांवर संतापले
‘मराठा आंदोलकांच्या मागण्यांबाबत आमचे काही म्हणणे नाही. परंतु मराठा आणि कुणबी एकत्र होऊ शकत नाही, हे सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्ट केले आहे. काही वर्षांपूर्वी मराठा मोर्चे निघाले. गुजरातमध्ये पाटीदार, राजस्थानात गुर्जर, हरियाणात जाट समाजाचे मोर्चे निघाले. त्यावेळेला आर्थिक मागासवर्गीय प्रवर्गाचा (ईडब्ल्यूएस) पर्याय पुढे आला, त्यानुसार केंद्र सरकारने कायदा केला.
Maharashtra Timesमराठा आंदोलक आणि बसमधील प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी, जुहू बस स्थानकाचा व्हिडीओ व्हायरल
दलित, आदिवासीत जे बसत नाहीत, परंतु आर्थिकदृष्टया शैक्षणिकदृष्टया मागास आहेत, सामाजिकदृष्टया मागास नाहीत. त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस केंद्र सरकारने आणले. ईडब्ल्यूएस लागू झाले १० टक्के. त्यात १० पैकी आठ टक्क्यांचा फायदा मराठा समाजाच्या उमदेवारांनी घेतला. ईडब्ल्यूएसनंतर पाटीदार,जाट, गुर्जरांचे आंदोलन बंद झाले. तरीसुद्धा काही जण ऐकायला तयार नव्हते. नंतर मराठा समाजास १० टक्के वेगळे एसईबीसी आरक्षण दिले. ते टिकविण्याची लढाई सुरू आहे. परंतु आता ओबीसीतच पाहिजे हा दुराग्रह कशासाठी,’ असा प्रश्न भुजबळ यांनी केला.

भुजबळांवर टीका, ओबीसीतून आरक्षण शक्य? मराठा अभ्यासक योगेश केदार थेट बोलले

‘मग ब्राह्मणही कुणबी ठरतील का ?’
जेकुणबीआहे ते कुणबीच आहेत. आम्ही ते मान्य करतो. आमचा यावर कोणताही आक्षेप नाही. एखाद्या समाजाने मागणी केली, आंदोलन केले म्हणून त्यासाठी राज्यघटना आणि कायदा बाजूला ठेवला जात नाही. शेती करतात त्यांना कुणबी माना, अशी मागणी केली जात असून आजच्या घडीला ब्राह्मण, मारवाडी समाजातील शेतकरी आहेत, त्यामुळे त्यांनाही कुणबी म्हणायचे का, असा प्रश्नही भुजबळ यांनी केला.

 

Author

Leave a Comment