Devendra Fadnavis: पुण्यात ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत.
मुंबई :मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करण्यात आला. जो मार्ग काढता येईल तो न्यायालयात कायदेशीररित्या कसा टिकू शकेल यावर बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे जो काही मार्ग काढायचा आहे, तो काढण्याची आमची मानसिकता आहे. त्यावर आमचे काम सुरू आहे,’ अशी माहितीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी सोमवारी दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. या बैठकीबाबत विचारलेल्या प्रश्नाला फडणवीस यांनी उत्तर दिले. Maharashtra Weather Update: राज्यात तीन दिवस धो-धो बरसणार; IMDकडून ‘या’ जिल्ह्यांत अलर्ट जारी, वाचा वेदर रिपार्टआंदोलन सुरू असताना सरकारने कुठेही आडमुठेपणाची भूमिका घेतलेली नाही. परंतु चर्चा करणारे लोक नसतील तर सरकारने चर्चा कुणाशी करायची? माईकवर अशी चर्चा होते का,’ असा प्रश्न त्यांनी केला. ‘आंदोलकांच्या वतीने सरकारला जे निवेदन दिले आहे त्यातून काही मार्ग निघतोय का, हे आम्ही बघत आहोत. त्यामुळे आंदोलकांच्या वतीने कुणी चर्चेला समोर आले तर लवकर मार्ग निघेल,’ असे ते म्हणाले.खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणावरून फडणवीस यांना लक्ष्य करताना त्यांना त्यांच्या जुन्या विधानाची आठवण करून दिली आहे. याकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले, ‘त्यांनी सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजण्याचे काम बंद केले पाहिजे. कारण त्यातून आपलेच तोंड पोळते. ’जरांगे समर्थकांना पनवेलमध्ये बेदम मारहाण; कार घासली गेल्याचा राग, पाच संशयितांना अटकआपली संस्कृती कोठे चालली आहे?‘या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती कोलमडलेली नाही. जेथे रास्ता रोको झाला तेथे पोलिसांनी १५ ते २० मिनिटांत मार्ग मोकळे केले. मात्र, आंदोलनाच्या दरम्यान अशा काही घटना घडल्या आहेत की त्या भूषणावह नाहीत. त्यामुळे आंदोलकांकडून ही अपेक्षा नाही. आता त्याचेही समर्थन होणार असेल तर महाराष्ट्राची संस्कृती नेमकी कुठे चालली आहे, याचा विचार करावा लागेल. आपण छत्रपती शिवरायांचे नाव आणि त्यांचा इतिहास सांगणारे लोक आहोत. छत्रपतींचा इतिहास सांगत असताना आपण अशा पद्धतीने वागलो तर कुठेतरी आपण छत्रपतींचा अपमान करत नाही का? आपल्या संस्कृतीचा अपमान करत नाही का हा प्रश्न आहे,’ असेही फडणवीस म्हणाले.