Kalyan garbage issue : स्मार्ट कल्याणमध्ये पुन्हा कचराकोंडी

ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे शहरातील कचरा वेळेवर उचलला जात नाही. नांदिवलीसह अनेक भागांत रस्त्याच्या कडेला ढिगारे पडून राहतात. पावसामुळे या कचर्‍यातून असह्य दुर्गंधी येते, तसेच डास, माशांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो सारख्या साथीचे आजार पसरल्याची भीती आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही महापालिकेचे कचरा व्यवस्थापन सुधारलेले नाही, उलट नागरिकांच्या जीवनमानाशी खेळ केला जातो आहे.
 

Author

Leave a Comment