Heavy rains in Ahmedpur taluka affect crops on 43 thousand hectares
अहमदपूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रशासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली असून, नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. आतापर्यंत ४३००० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्ज्वला पांगरकर, तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे आणि गटविकास अधिकारी पंकज शेळके यांनी बाधित भागांना भेटी देऊन शेतकऱ्यांना धीर दिला.