Manoj Jarange Patil Ends Hunger Strike : मनोज जरांगे पाटलांनी अखेर आज पाचव्या लिंबू सरबत पिऊन आपलं उपोषण सोडलं आहे. यादरम्यान, जरांगे पाटलांनी यांनी शिवनेरी आणि मुंबईत हृदयविराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या युवकांना करण्याबाबत विनंती केली आहे. यावरही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मकता दाखवली आहे.
मुंबई : ‘तुमच्या पाठिंब्याने जिंकलो’, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या विजयाची घोषणा केली. ‘सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या असून हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियरचा शासन निर्णय तासभरात आपल्या हाती येईल’, असे जरांगे पाटील यांनी म्हटलं. अखेर पाचव्या दिवशी पाटलांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातून लिंबू सरबत पिऊन आपलं उपोषण सोडलं आहे. यादरम्यान, मनोज जरांगे यांनी जुन्नर आणि मुंबईत काही दिवसांपूर्वी आंदोलनादरम्यान दोन युवकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्याबाबतही मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना मदत करण्याची मागणी केलीय.
मनोज जरांगे काय म्हणाले?उपोषण सोडण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना एक विनंती केली. ते म्हणाले की, ‘लातूरला दोन पोरांनी परवानगी नाकारली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला. शिवनेरीला सतीश देशमुख म्हणून आणि काल इथे सीएसएमटीला विजय घोगरे या दोन पोरांचे हार्ट अटॅकने बळी गेले. त्यांनासुद्धा आर्थिक मदत आणि नोकरीत घ्या, गरिबाचे लेकरं आहेत’. त्यावर विखे पाटील म्हणाले, ‘मी मुद्दाम बोललो नाही की, आपल्या जीआरमध्ये (GR) उल्लेख आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या दोन्ही कुंटुंबाना मदत करण्याचं आणि नोकरी देण्याचं मान्य केलं आहे’, असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. संघर्षयोद्धा! डोळ्यांमध्ये अश्रू अन् चेहऱ्यावर समाधान, मनोज जरांगे पाटील यांनी सोडलं उपोषण, आझाद मैदानात मराठ्यांचा जल्लोष
दरम्यान, मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर पाचव्या दिवशी उपोषण सोडलं आहे. मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह समितीच्या इतर सदस्यांनी केलेली शिष्टाई यशस्वी ठरली आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर सरकारच्या शिष्टमंडळाच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी लिंबू सरबत पिऊन उपोषण मागे घेतलं आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावं, अशी इच्छा व्यक्त केली. पण त्यांची ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. सरकारच्या शिष्टमंडळाने सर्व निर्णय हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानेच घेतला असल्याचं सांगितलं.