प्रत्येक घरातून तयार केलेला स्वयंपाक आयशरद्वारे मुंबईतील आझाद मैदानावर पाठवला जाणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर लाखो मराठा बांधव आंदोलन करत आहेत. त्यांना अन्न-पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे गावात भंडारा न करता, प्रत्येक घरातून चपाती, भाजी, चटणी आदी तयार करून मुंबईला पाठवूया, असे आवाहन वाढेकर यांनी केले आहे. सोमवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रत्येक गावातील गणेश मंडळाच्या ठिकाणी अन्नधान्य जमा करण्यात आले. त्यानंतर सर्व मंडळांचे प्रतिनिधी एकत्र येतील आणि ठरलेल्या वेळेत आयशर मुंबईकडे रवाना होणार आहेत. जालना तालुक्यातील गावांतील गणेश मंडळांनी हा निर्णय एकमताने घेतला असून, प्रत्येक घरातून चपाती, भाजी, चटणी यासारखे अन्नपदार्थ जमा करण्याचे आवाहन केले आहे.