Nepal Protest : लोकशाहीची हत्त्या, सरकारकडून रक्तपात, 14 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात.., नेपाळच्या तरूणांकडून रोष व्यक्त

Nepal Gen Z Protest News – नेपाळमध्ये तरूणांनी रस्त्यावर उतरत मोठ आंदोलन उभं केल आहे या दबावाखाली तेथील पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे. गेल्या दोन दिवसातील सरकारने केलेला अत्याचार युवकांनी सांगितला आहे.
काठमांडू: युवकांनी केलेल्या आंदोलनामुळे नेपाळमध्ये पंतप्रधान आणि अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले आहे. सोशल मीडियावर घातलेल्या बंदीविरोधात 8 सप्टेंबरपासून आंदोलन सुरू होते. जेन झीच्या आंदोलनाला मोठे स्वरूप मिळाले. सोशल मीडिया बंदी नव्हे तर सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार याविरोधातही हे आंदोलन होते. या आंदोलनाचा दबाव वाढत गेला आणि केपी ओली यांनी पंतप्रधानपद सोडले. अजूनही आंदोलनकर्ते तरूण रस्त्यावर आहेत. त्यांनी संसदभवन, राष्ट्रपतीभवनावर कब्जा केला आहे. या संपूर्ण आंदोलनावर नेपाळच्या तरूणांनी आपलं म्हणणं मांडले आहे.
जायबंदी करण्याऐवजी थेट गोळीबार अन्…तेथील दुसऱ्या तरूणानं सांगितले की, आज जेन झीने एकत्र येत संसद भवनावर कब्जा केला आहे. काल नेपाळ पोलिसांनी जी कारवाई करताना विद्यार्थ्यांना टार्गेट करत गोळी मारली. गोळी मारण्याचा एक पद्धत असते. तुम्ही त्या व्यक्तीला जायबंदी करू शकता. पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी थेट डोक्यात, छातीत गोळ्या घातल्या आणि त्यात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. आम्ही आता परिवर्तनाच्या शोधात आहोत. तरूणांच्या हाती सत्ता असली पाहिजे. निर्दयी अन् क्रुरआकाश यादव या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने प्रतिक्रिया देताना सांगितले की, माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्ही सर्व पाहात आहात. युवा आणि विद्यार्थी येथे आंदोलनासाठी आले. या दबावामुळेच सत्ताधाऱ्यांनी देशातून पलायन केले आहे. ते राष्ट्राचे हत्यारे आहेत. त्यांनी आमच्या 14 वर्षीय मुलाला थेट डोक्यात गोळी मारून संपवले. हे खूप निर्दयी आणि क्रुर आहे. मी आशा करतो पुढील पंतप्रधान चांगला असेल.
अहंकार गाडलासंसद भवनात आंदोलन करणाऱ्या तरूण म्हणाला की, सर्वांनाच माहित असेल की, विद्यार्थ्यांना काल मारण्यात आले. मृत्यूंचा आकडा 21,22 की किती आहे हे माहित नाही. 500 हून जास्त जण जखमी झाले आहेत. जर विद्यार्थ्यांना असे मारण्यात येणार असेल तर देश असा चालणार नाही. हे रक्तपात करणार शासन झाले. कोणत्याही देशात असे चालत नाही. ऐवढ्या छोट्या देशात असे शासन कसे असू शकते. आमच्या लोकांनी प्राणत्याग करत ही लोकशाही नेपाळमध्ये आणली. पण अशी लोकशाही कोणालाच नको. तुम्ही पाहत असालच संसद भवनात नेते बसायचे ते जळत आहे. त्यांचा अहंकार गाडला गेला आहे.

 

Author

Leave a Comment