NMMC Recruitment 2025 Updates: नवी मुंबई महानगरपालिकेच्या नोकरभरतीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांनी भरतीविरोधात न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने हा निर्णय घेतला. महापालिकेने घेतलेल्या परीक्षेचा निकाल पुढील सूचना मिळेपर्यंत जाहीर करू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २३ सप्टेंबर रोजी होणार आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिकेने ६२० पदांसाठी भरती आयोजित केली होती.
Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2025 :नवी मुंबई महानगरपालिकेच्या नोकरभरतीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. महापालिकेने घेतलेल्या परीक्षेचा निकाल पुढील सूचना मिळेपर्यंत जाहीर करू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांनी भरतीविरोधात कोर्टात धाव घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला. काही महिन्यांपूर्वी नवी मुंबई महापालिकेमध्ये ६२० पदांसाठी भरती आयोजित केली होती.
नवी मुंबई महानगरपालिकेत (NMMC Bharti 2025) आधीपासूनच ७३ कर्मचारी ठोक मानधनावर काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांनी सेवेत कायम करण्याची मागणी केली होती. डिसेंबर २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या कर्मचाऱ्यांचा विचार करायला सांगितला होता. पण, ज्या कर्मचाऱ्यांची जाहिरात आणि मुलाखत झाली नाही, त्यांना सेवेत घेऊ नये, असे शासनाच्या २००६ च्या परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेने या परिपत्रकाचा आधार घेतला.रत्न-आभूषण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र सरकारकडून प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची घोषणा
चार आठवड्यांची मुदत -महापालिकेतील ६६८ पदांसाठी १६, १७, १८ आणि १९ जुलै २०२५ रोजी परीक्षा झाली. यासाठी ८४,७७४ अर्ज आले होते. उमेदवारांना सोपे जावे म्हणून १२ जिल्ह्यांमध्ये २८ परीक्षा केंद्रे होती. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेमधील ४८ पंप ऑपरेटरला कायम सेवेत घेण्याचे आदेश दिले आहेत. या कर्मचाऱ्यांचा २००६ पासून न्यायालयीन लढा सुरू होता. औद्योगिक न्यायालयाने आधी निर्णय दिला होता, ज्याला महापालिकेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने महापालिकेला यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे.
Engineering Admission 2025: ‘अभियांत्रिकी’ प्रवेशात पुणे अव्वल; राज्यभरात आजवरचे विक्रमी एक लाख ६६ हजारावर प्रवेश
महापालिका काय म्हणाली?नवी मुंबई महापालिकेच्या सुरू असलेल्या नोकर भरती प्रक्रियेविरोधात महापालिकेत कार्यरत असलेल्या करारपद्धतीवरील कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेस नोकर भरतीचा निकाल ( स्कोर बोर्ड) तूर्तास जाहीर न करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी येत्या २३ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती महापालिकेच्या प्रशासन विभागाचे उपायुक्त किसनराव पालांडे यांनी दिली.