Potholes on Highway : कोट्यवधी खर्चुन अहमदाबाद महामार्गावर खड्डे

या महामार्गावर ४ सप्टेंबर २०२२ रोजी उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर रस्त्याच्या डिझाइन आणि सुरक्षिततेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. पुलाचे रेलिंग सुरक्षा कठडे आणि स्ट्रीट लाईटची समस्या या महामार्गावरील अनेक पुलांचे डेक नीचांकी असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. वाहन खाली कोसळण्याची शक्यता असल्याने प्रवाशांचे प्राण धोक्यात येत आहेत. तसेच महामार्गावरील स्ट्रीट लाईट्स रात्री बंद राहतात, ज्यामुळे वाहनचालकांना अंधारात रस्ता न दिसता अपघात घडण्याची शक्यता वाढते. वसई-विरार युवक काँग्रेसचे अध्यक्ष यांनी प्राधिकरणाला पत्र लिहून पुलाचे संरक्षक कठडे उंचावणे, स्ट्रीट लाईट्स सुरू ठेवणे आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
 

Author

Leave a Comment