Pune Crime : वनराज यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, बंडू आंदेकरांच्या टोळीचा बदल्याचा गेम फसला, पुणे पोलिसांची कारवाई

Pune Crime News : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. बंडू आंदेकरांचा मुलगा वनराज आंदेकर यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झालं. मात्र याच दिवशी हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने कट रचला होता, पण पोलिसांना लागलेल्या त्या एका टीपमुळे मोठा प्लॅन फसला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

म.टा. प्रतिनिधी, पुणे :माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होताच, विरोधी टोळीने रक्तरंजित बदला घेण्याचा कट आखला होता. शस्त्रसाठ्यासह ‘गेम’ वाजविण्याची तयारी रविवारी मध्यरात्री सुरू होती. मात्र, गुन्हे शाखेच्या टेहळणीमुळे डाव उधळला. पोलिसांनी वॉच ठेवणाऱ्याला रंगेहात पकडले, तर बाकीचे साथीदार फरारी झाले. त्यामुळे आणखी एका खुनाचा प्लॅन फसला असला, तरी कटाचा सूत्रधार अजूनही बेपत्ता असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे.

पुण्यातील कुख्यात बंडू आंदेकर व सूरज ठोंबरे टोळीतील वैर गेल्या काही वर्षांत वाढले आहे. सन २०२३ मध्ये आंदेकर टोळीने शुभम दहिभाते आणि निखिल आखाडेवर नाना पेठेत हल्ला केला होता. त्यात निखिलचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून ठोंबरे टोळी संतप्त होती. त्याचाच बदला म्हणून एक सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक आणि आंदेकर टोळीचा ‘बँकबोन’ समजल्या जाणाऱ्या वनराज आंदेकर यांचा नाना पेठेतील डोके तालीम परिसरात खून करण्यात आला. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. आता आंदेकर खुनाला एक वर्ष पूर्ण होत आहे.
Maharashtra Timesमराठा आंदोलकांनी घेराव घातला, गाडीवर बाटल्या फेकल्या, सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया
‘बदला घेण्यासाठी टोळी सज्ज आहे’ अशी चर्चा गुन्हेगारी वर्तुळात पसरली. त्यासाठी आंदेकर टोळीकडून जमवाजमव करण्यात येत होती. त्यांनी ‘टार्गेट’ ही ठरवले होते. रविवारी मध्यरात्री ते हल्ला करणार होते. त्याची तयारीही केली; पण पोलिसांना मिळालेल्या अचूक माहितीमुळे आंदेकर टोळी चा डाव सध्या तरी हाणून पाडणे पोलिसांना शक्य झाले. भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर अन्य एकाला ताब्यात घेण्यात आले. या दोघांकडेही तपास केला जात आहे.
Maharashtra TimesPune Metro in Ganeshotsav : मेट्रो प्रवासी संख्येचा नवा उच्चांक, गणेशोत्सवानिमित्त रेकॉर्डब्रेक गर्दी; मेट्रो ठरतेय पसंती

भाड्याने घेतली ‘रूम’

आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड याच्यासह अनेक आरोपी भारती विद्यापीठ, आंबेगाव भागात राहायला आहेत. ते सध्या येरवडा कारागृहात आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताने त्याच परिसरात भाड्याने रूम घेतली होती. तो नेमके कोणावर
‘वॉच’ ठेवून होता, हे अद्याप कळालेले नाही. मात्र, त्याचे आंदेकर टोळीतील काही पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांशी संपर्क असल्याचे दिसून आले. दरम्यान, पोलिसांनी आंदेकर टोळीतील काही जणांचे मोबाइल लोकेशन तपासले असता, ते ‘भारती’च्या हद्दीतच असल्याचे आढळून आले, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

 

Author

Leave a Comment